Breaking News
नवी दिल्ली: भारतातील खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. जवळपास 88 टक्के भारतीय कंपन्या या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढ करण्यास अनुकुल आहेत. एऑन या व्यावसायिक सर्व्हे करणाऱ्या कंपनीच्या अहवालातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा फटका बहुतांश सर्व उद्योगांना बसला होता. त्यामुळे आर्थिक मंदी सदृष्य परिस्थिती तयार झाल्याने अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. देशातील सर्वच खासगी उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 40 टक्क्यांपासून ते 60 टक्क्यांपर्यंत कपात केली होती.
सध्या उद्योग क्षेत्र कोरोनाच्या मंदीतून बाहेर येताना दिसतंय. त्यामुळे या वर्षी देशातील 88 टक्के खासगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी सकारात्मक आहेत. एऑनच्या अहवालानुसार सरासरी 7.7 टक्के इतकी पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर